अंतरिम अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेल्या कर रचनेत त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कररचनेमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. प्राप्तिकराच्या रचनेत बदल होणा नसल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे करदात्यांसाठी परिस्थिती जैसे थेच असेल. आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम राखत आहोत, असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. अंतरिम अर्थसंकल्पात लोकानुनय करणाऱ्या घोषणा केल्या जात नाहीत. त्यामुळेच मोदी सरकारनंही निवडणुकीआधीच्या अर्थसंकल्पात लोकानुनयी घोषणा टाळल्या. कर रचनेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. वार्षिक ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. रेल्वेचे ४० हजार डबे 'वंदे भारत'प्रमाणे करण्याची घोषणा निर्मला सीतारमन…