करदात्यांच्या व्यवहार

अनवधानाने का होईना पण करदात्याकडून योग्य ती माहिती विवरणपत्रात भरताना नमूद केली गेली नाही, तर अशा करदात्याला त्रास सहन करावा लागतो. अशा व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याकडे अनेक स्रोतांतून जमा होत असते. विवरणपत्र भरण्यापूर्वी करदाता ती माहिती आता बघू शकणार आहे. करदाता आपल्या उत्पन्नाची, व्यवहाराची आणि कराची माहिती विवरणपत्राद्वारे प्राप्तिकर खात्याकडे दर वर्षी सादर करीत असतो. प्राप्तिकर खात्याकडेसुद्धा करदात्याच्या अनेक व्यवहारांची माहिती विविध सरकारी खाते, बँका, संस्थांकडून प्राप्त होत असते. ही माहिती करदात्याने सादर केलेल्या विवरणपत्राबरोबर तपासली जाते आणि त्यात काही तफावत असेल तर प्राप्तिकर खात्याकडून याबाबत विचारणा केली जाते. अनवधानाने का होईना पण करदात्याकडून योग्य ती माहिती विवरणपत्रात भरताना नमूद…

घसरते व्याजदरही पसंतीचे!

महागाईच्या तुलनेत कमी परतावा मिळत असला तरी सध्याच्या अर्थसंकटात गुंतवणूकदारांचा कल बँकांमधील ठेवींकडेच अधिक राहिल्याचे स्पष्ट होत आहे. स्टेट बँकेच्या ताज्या अहवालातून गुंतवणूकविषयक कल अधोरेखित झाला आहे. भारत हा बचतकर्त्यांचा देश समजला जातो. बचतीचा मोठा हिस्सा निश्चित उत्पन्न देणाऱ्या आणि परताव्याची खात्री असलेल्या विमा संलग्न आणि बँकांच्या मुदत ठेवीत गुंतविण्यात येतो. घरगुती बचत खरेदी काही कालावधीसाठी लांबणीवर टाकू न उत्पन्नाचा काही हिस्सा ते बचत करीत असतात. खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजना महागाईपेक्षा कमी परतावा देतात, असे प्रबोधन म्युच्युअल फंडांकडून होत असते. असे असले तरी बचतीसाठी आजही ठेवीदार हे बँक ठेवींचा वापर करीत असल्याचे दिसते

मुखपट्टी उद्योग——

करोना संसर्गामुळे वस्त्रोद्योग संकटात सापडला असला तरी मुखपट्टय़ांच्या (फेसमास्क) रूपाने या उद्योगाला संजीवनी मिळाली आहे. व्हीआयपी क्लोदिंग लि., रेमंड ते जिओर्दानो आणि वाइल्डक्राप्ट या विदेशी कंपन्यांही आता मुखपट्टय़ांच्या उत्पादनात उतरल्या आहेत. भारतात मुखपट्टय़ांची बाजारपेठ १० ते १२ हजार कोटींची असल्याचा अंदाज व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेडचे संचालक कपिल पाठारे यांनी व्यक्त केला. आंतर्वस्त्रांसाठी प्रसिद्ध या नाममुद्रेने ‘सेफ्टीवेअर’ विभागात प्रवेश करत मुखपट्टय़ांच्या निर्मितीस सुरुवात केली आहे.

‘होम लोन’चे व्याजदर

गृहकर्जांच्या व्याजदरांवरून आता बँका आणि एनबीएफसींमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदर घटवून ६.८० टक्क्यांवर आणला आहे. या शिवाय बँकेने नोकरदार महिलांसाठी ६.७० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. मात्र, हा व्याजदर एक्स्टर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटवर (ईबीएलआर) अवलंबून असल्याने ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर ७००च्या वर आहे, त्यांनाच लाभ घेता येणार आहे.

करदात्यांसाठी आनंदाची बातमी

इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० होती. जर या तारखेपर्यंत करदात्यांनी रिटर्न फाइल केले नाही तर त्याला पुन्हा संधी मिळणार नव्हती. आता ही मुदत ३१ जुलैवरून वाढवून ती ३० सप्टेंबर २०२० करण्यात आली आहे. सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी रिटर्न दाखल करण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे.

अनिश्चितता लवकरात लवकर दूर करावी —

वस्तू आणि सेवा कर संकलन, रेल्वेद्वारे मालवाहतुकीतील वाढ, पेट्रोलची वाढलेली मागणी, विजेचा पूर्वीच्या पातळीवर आलेला अत्युच्च वापर, इलेक्ट्रॉनिक पथकर संग्रहण वगैरे अर्थचक्र पूूर्वपदावर येत असल्याचे ठोस संकेत आहेत, असे प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने मंगळवारी केले. हे पाहता करोनाबाधा आणि टाळेबंदीने ग्रासलेल्या अर्थव्यवस्थेत तीव्र स्वरूपाची उभारी दिसून येईल, असा विश्वासही या संघटनेने व्यक्त केला आहे. ही खरोखरच आश्वासक चिन्हे असून, टाळेबंदी उठल्यानंतर अर्थव्यवस्थेत इंग्रजी आद्याक्षर ‘व्ही’ आकाराप्रमाणे तीव्र स्वरूपाची उभारी शक्य असल्याचे दिसून येते. तथापि फेरउभारीची ही प्रारंभिक लक्षणे असून, त्यांना ठोस स्वरूप यावयाचे तर, टाळेबंदी आणि निर्बंधांसंबंधी देशाच्या कैक भागात असलेली अनिश्चितता लवकरात लवकर दूर केली जायला हवी.

दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय स्टॉक भारतीय कंपनीचा!

जगातील सर्वात लोकप्रिय स्टॉकमध्ये पहिल्या स्थानावर चीनमधील इ कॉमर्स कंपनी अलीबाबा आहे. तर दुसऱ्या स्थानावर भारतातील खासगी क्षेत्रातील बँक आयसीआसीआयचा नंबर लागतो. ५९ विश्लेषकांनी ICICI बँकेला ट्रॅक केले आणि सर्वांनी बँकेचे स्टॉक खरेदी करा असा सल्ला (Buy call) दिला. ६४ विश्लेषकांनी अलीबाबाला ट्रॅक केले आणि त्यापैकी ६३ जणांनी त्याची खरेदी करण्याचा सल्ला दिला. तर एकाने होल्ड (Hold Call)वर ठेवण्यास सांगितले. फायद्याचा विचार केल्यास आयसीआसीआय बँकेने गेल्या १० वर्षात शानदार कामगिरी केली आहे. बँकेने जुलै २०१० ते जुलै २०२० या काळात गुंतवणुकदारांना ८.७० टक्के रिटर्न दिलाय. तर या काळात सेन्सेक्समध्ये ७.८ टक्के इतकी वाढ झाली होती. फक्त भारताबाबत रिटर्नचा विचार करता…

तुम्हीही मुकेश अंबानी बना !!

कोवीड pandemic या आपल्या मानवजातीवर झालेल्या हल्याच्या बातम्या गेले सहा महिने सतत आपल्या कानावर आदळत असताना गेल्याच आठवडयात आपण सर्वांनी  एक मोठी पाहिली आणि ऐकली सुद्धा !! कोणती बरे ती ? रिलायंस industries सन्माननीय मुकेशजी अंबानी यांची गणना जगातल्या पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये झाली आहे !!आणि त्यातही महत्वाचे म्हणजे त्यांनी वारेन बफे यांनाहि संपत्तीमध्ये मागे टाकले आहे !! apple , गुगल , फेसबुक , सौदी अर्माको यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांनी रिलायंस मध्ये गुंतवणूक केली आणि रिलायंस debt फ्री झाली हीच ती महत्वाची बातमी कि ज्यामुळे मुकेशजी पहिल्या पाचमध्ये जाऊन बसले !! गेले सहा महिने जगातील सर्व शेअर बाजार अस्थिरतेच्या वातावरणात असताना आपल्या…

मग गुंतवणूक करायची तरी कुठे?

आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेता असं लक्षात येत  की, अर्थव्यवस्था किती खाली जाणार आहे याबद्दल सगळेच साशंक आहेत, टाळेबंदी कधी संपणार हेसुद्धा कळत नाही, करोनाचे आकडे अजून किती दिवस असे वाढणार आणि त्याचा प्रादुर्भाव कसा कमी होणार, ही मोठी चिंता बऱ्याच देशांना सतावत आहे, उद्योगधंदे अजूनही पूर्णपणे सुरू नाही होऊ शकले आहेत! आणि या सर्वापेक्षा सामान्य व्यक्तीला भेडसावणारा प्रश्न आहे तो पैशांचा! अगदी नोकरी नसणाऱ्यांपासून ते चांगली गुंतवणूक असणाऱ्यालासुद्धा. ज्येष्ठांचा वर्ग जो मुदत ठेवी, प्रधानमंत्री वय वंदना योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये सगळेच पैसे ठेवत होते ते चिंतेत आहेत की, यापुढे अजून किती कमी व्याजदर पाहावे लागणार आहेत. जी मंडळी ‘म्युच्युअल…

गृहविमा

आपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी आपण अविरत कष्ट करतो. ते सुरक्षित राखण्यासाठी संरक्षक दरवाजा, कॅमेरे व उत्तम दर्जाचे कुलूप अशी सुरक्षा साधने वापरतो. सर्वसाधारणपणे आपल्या आयुष्यातला प्रदीर्घ काळ घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच घालवतो. मात्र, गृहविम्यासारखे अतिशय महत्त्वाचे सुरक्षा साधन आपण विसरतो. भारतात एकूणच विमा उतरवण्याचे प्रमाण अतिशय अत्यल्प म्हणजेच एक टक्क्याहूनही कमी आहे. त्यामुळे गृहविमा उतरवण्याचे प्रमाण त्याहूनही कमी आहे. घराचा मालक अथवा त्याचा वापर करत असणारी कोणतीही व्यक्ती गृहविमा उतरवू शकते. भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीदेखील गृहविमा घेऊ शकतात. घराची मालकी एखाद्या संस्थेकडे असल्यास अशी संस्थादेखील विमा उतरवू शकते. गृहविम्यामध्ये आग व त्या संबंधित घटना, दरोडा, चोरी, दहशतवादी हल्ला आदी…

End of content

No more pages to load