मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा
मुदत ठेवींच्या तुलनेत सरस परतावा देणारी एक योजना सध्या सुरु आहे. भारत बाँड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) खुला झाला असून त्यातून १४००० कोटींचा निधी उभारला जाणार आहे. ही योजना १७ जुलै पर्यंत खुली आहे. यापूर्वी आलेल्या भारत बाँड ईटीएफ ना वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून चांगली पसंती मिळत आहे. गेल्या वर्षी आलेल्या या योजनेत १२४०० कोटींचा निधी सरकारने उभारला होता. यंदाही ११ वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येईल. भारत बाँड ईटीएफमध्ये किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येईल.या योजनेत वैयक्तिक गुंतवणूकदार जास्तीत जास्त २ लाखांची गुंतवणूक करू शकतो.शुक्रवार १७ जुलैपर्यंत ही योजना गुंतवणुकीसाठी खुली आहे. केंद्र सरकारच्या भारत ईटीएफमधून यावेळी १४००० कोटींचा निधी उभारला…