गुंतवणूक संधी–मिरे अॅसेट कॉपोरेट बॉण्ड फंड

वेगाने वाढणाऱ्या भारतातील म्युच्यूअल फंडांपैकी एक असलेल्या मिरे अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडियाने मुदतमुक्त प्रकारात नवीन म्युच्यूअल फंड बाजारात आणला आहे. प्रामुख्याने एए प्लस आणि त्यापेक्षा अधिक पतदर्जा असलेलल्या डेट योजनांमध्ये या फंडातील निधी गुंतविला जाणार आहे. हा फंड गुंतवणूकदारांसाठी खुला झाला असून ९ मार्च २०२१ ला बंद होणार आहे. या फंडासाठी निफ्टी कॉर्पोरेट बॉण्ड इंडेक्स हा आधारभूत निर्देशांक आहे. या फंडाचे व्यवस्थापन नियमित उत्पन्न विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेंद्र जाजू करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून परतावा आणि रोखता हे दोन्ही हवे आहेत. मिरे अॅसेट कॉपोरेट बॉण्ड फंड मध्यम प्रकारची जोखीम घेत उत्पन्न मिळवून देताना उच्च दर्जा आणि…

तांत्रिक अडथळा तेजीत रूपांतरित

राष्ट्रीय शेअर बाजारातील तांत्रिक अडथळा बुधवारी प्रमुख निर्देशांकाच्या पथ्यावर पडला. आठवडय़ातील तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून निर्देशांक वाढ नोंदवणारा सेन्सेक्स व निफ्टी दुपारच्या खंड व्यवहारानंतर विस्तारित व्यवहार कालावधीत लक्षणीय तेजी नोंदवता झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवार सायंकाळअखेर १,०३०.२८ अंशवाढीने ५०,७८१.६९ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७४.२० अंशवाढीसह १४,९८२ पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांत मंगळवारच्या तुलनेत जवळपास प्रत्येकी २ टक्के वाढ नोंदली गेली. सेन्सेक्स ३० मध्ये अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक, ५ टक्क्यांनी झेपावला. त्याचबरोबर एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँकही वाढले. गुंतवणूकदारांकडून विशेषत बँक व वित्त क्षेत्रातील समभागांची खरेदी झाली, तर पॉवरग्रिड, डॉ. रेड्डीज्, टीसीएस, एशियन पेंट्स…

तांत्रिक बिघाडानंतर सेबीने शेअर बाजारांची वेळ वाढवली

राष्ट्रीय शेअर बाजारात सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने वाया गेलेली शेअर व्यवहारांची वेळ सेबीने वाढवली आहे. आज दोन्ही शेअर बाजार नेहमीच्या वेळेपेक्षा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील, असे सेबीने जाहीर केले आहे. शेअर बाजाराचे व्यवहार आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे. मुंबई शेअर बाजार  आणि राष्ट्रीय शेअर बाजा सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत सुरु असतात. मात्र आज सकाळी ११.४० मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजारात तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व व्यवहार ठप्प झाले. कोट्यवधींचे व्यवहार सुमारे तीन तासांहून अधिक वेळ ठप्प झाले होते. दुपारी ३.४५ मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार पूर्ववत झाले.

दोन न्यू फंड ऑफर्स

motilal ostwal असेट मॅनेजमेंट कंपनीने (एएमसी) दोन न्यू फंड ऑफर्सची (एनएफओ) घोषणा केली आहे. मोतीलाल ओसवाल असेट अलोकेशन पॅसिव फंड- अॅग्रेसिव आणि मोतीलाल ओसवाल असेट अलोकेशन फंड पॅसिव फंड ऑफ फंड्स-काँझर्वेटिव्ह असे दोन फंड 19.02.2021पासून  गुंतवणुकीसाठी खुले झाले. हे फंड ऑफ फंड्स (एफओएफ्स) डिजिटल पार्टनर ग्रोव (Groww) अॅपवरही उपलब्ध आहेत. यामुळे गुंतवणूकदाराला त्याची जोखीम पत्करण्याची तयारी व गुंतवणुकीची उद्दिष्टे यांच्या प्रमाणे कमी खर्चाच्या तसेच वैविध्यपूर्ण असेट्समध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल. मर्यादित (मॉडरेट) पोर्टफोलिओच्या शोधात असलेला गुंतवणूकदार दोन्ही फंड्समध्ये ५०:५० गुंतवणूक करू शकतो. आत्तापर्यंतच्या सर्वांत निचांकी स्तरावरील संबंधित असेट वर्गांमध्ये गुंतवणूक करण्याचा लाभ दोन्ही फंड्स घेऊ शकतात. एनएफओ बंद होण्याची तारीख :…

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या ४ योजनांचा परतावा पहा !!!!

सायक्लिकल म्हणजे असे शेअर्स जे विशिष्ट थीमवर किंवा हंगामावर आधारित असतात. प्राप्त आकडेवारीनुसार गेल्या ९ महिन्यांत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्फ्रा फंडाने ८२.९ टक्के परतावा दिला आहे. तर याच्या इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने ७३.५ टक्के, मल्टी असेट फंडाने ४८.८ टक्के आणि इक्विटी अँड डेट फंडाने ५५.६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ९ महिन्यात ज्या गुंतवणूकदारांनी सायक्लिकल शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल त्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या ४ योजनांनी ९ महिन्यांत ८२ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. विशेष म्हणजे हा परतावा सरकारी कंपन्यांच्या शेअर्समधून मिळाला आहे.  

टाटा समूहाचा किराणा व्यवसायातील प्रवेश

मागील सहा महिन्यांपासून ऑनलाईन किराणा व्यवसायात येण्यासाठी तयारी करणाऱ्या टाटा समूहाने मोठी घोषणा केली आहे. टाटा समूहाने ऑनलाईन किराणा व्यवसायातील 'बिग बास्केट' या कंपनीची थेट खरेदी केली आहे. बिग बास्केटमधील तब्बल ६८ टक्के हिस्सा टाटा समूहाने ९५०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या डीलनंतर टाटा समूहाचा किराणा व्यवसायातील प्रवेश सुकर झाला आहे. टाटा समूह एक सुपर अॅप विकसित करत असल्याचे म्हटलं होते. टाटा सन्स आपल्या सुपर अॅपसाठी तोडीचा भागिदाराचा शोध टाटा समूहाकडून घेतला जात होता. टाटा या सुपर अॅपच्या माध्यमातून फॅशन, लाइफस्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, किराणा, विमा, वित्तीय सेवा यांसारखे व्यवसाय एकाच छताखाली आणण्याची टाटा समूहाची योजना आहे. या सुपर अॅपमध्ये…

‘पीपीएफ’वरील कराबाबत सरकारची मोठी घोषणा

भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) मध्ये अडीच लाखांवरील गुंतवणुकीवरील व्याजावर लागू होणार कर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसाठी नसेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

एप्रिलपासून ठेवींवर वाढीव व्याज; तर कर्जे महाग!

रिझव्‍‌र्ह बँकेच्या सलग चौथ्या व्याजदर आहे त्या पातळीवर स्थिर राखणाऱ्या पतधोरणानंतरही ठेवी तसेच कर्जावरील व्याजदरात मात्र बदल होणार आहेत. व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडे ठेवाव्या लागणाऱ्या रोख राखीव निधीच्या (सीआरआर) प्रमाण नव्या वित्त वर्षांपासून पूर्ववत ४ टक्के पातळीवर आणले जाणार आहे, त्याचा परिणाम बँकांच्या ठेवी तसेच कर्जाच्या व्याजदरावर एप्रिलपासून पुढे दिसून येऊ शकेल.

छोटय़ा गुंतवणूकदारांना थेट ‘जी-सेक’ खरेदीची मुभा

सामान्य गुंतवणूकदारांचा रोखे बाजारात सहभाग वाढविण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन म्हणून कोणाही मध्यस्थाविना थेट सरकारी रोख्यांची (जी-सेक) खरेदीला परवानगी देणारे पाऊल रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी टाकले. जागतिक स्तरावर मूठभर देशांमध्ये आणि आशियाई देशांमध्ये अशी परवानगी असणारा भारत हा एकमेव देश बनला आहे. आगामी आर्थिक वर्षांत केंद्र सरकारने विक्रमी १२ लाख कोटी रुपयांचे सार्वजनिक कर्ज उभारणीचे उद्दिष्ट ठेवले आहे, हे पाहता रिझव्‍‌र्ह बँकेचे हे पाऊल रोखे बाजाराला सखोलता प्रदान करण्यासह, सरकारला नवीन कर्जदाते अगणित स्वरूपात मिळविता येणार आहेत. सरकारसाठी कर्ज उभारणी ही रिझव्‍‌र्ह बँकेकडून केली जात असते. उद्योग क्षेत्र आणि संस्थांत्मक सहभागापुरते सीमित राहिलेल्या देशांतर्गत रोखे बाजारपेठेला सर्वसमावेशी रूप देण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे…

शहरी प्रवासी वाहतूक सुधारणा–?

१५-२० वर्षांची जुनी वाहने मोडीत किंवा स्क्रॅप करण्याचे धोरण. वाहन फिटनेस प्रमाणपत्र धोरण लवकरच आणणार. या धोरणामुळे मालवाहतूक, व्यापारी वाहन उद्योगात प्रचंड मोठी मागणी निर्माण होईल शहरी प्रवासी वाहतूक सुधारण्यासाठी सुमारे १८००० कोटींचा खर्च करणार. २० हजार बसेसची खरेदी सरकार करणार. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात शहरी प्रवासी वाहतूक सुधारणांवर जोर देणार असल्याचे सांगितले आहे. शहरी प्रवासी वाहतूक सुधारण्याकरता व प्रवाश्यांच्या सोयी करता सरकार सुमारे १८००० कोटींचा खर्च करणार असल्याचे व २० हजार बसेसची खरेदी सरकार करणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. यामुळे बस उत्पादन उद्योगाची मागणी वाढेल, जी महामारीमुळे खूपच कमी झाली होती. या गुंतवणुकीमुळे रोजगारसुद्धा वाढेल.

End of content

No more pages to load