आपतकालीन निधी
न सांगून येणाऱ्या आर्थिक अडचणींचे निरसन करण्यासाठी एखादा आपातकालीन निधी बाजूला काढून ठेवलाच पाहिजे, आगामी सहा महिन्यांमधील अनपेक्षित खर्चांची तजवीज होईल, इतकी रक्कम आपात्कालीन निधीत असणे आवश्यक आहे. अनेकांकडून याची अंमलबजावणी होईलच, असे काही नाही. अशा आर्थिक अडचणीच्या वेळी बचत किंवा शिलकीत काहीही नसले, तरी गांगरून जाण्याची आवश्यकता नाही. गरजेच्या प्रसंगी आर्थिक अडचण निर्माण झाल्यास त्यावर मात करणारी अनेक साधने आज बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, अशी रक्कम कर्जाऊ घेताना खरीच निकड आहे, का याची चाचपणी करणे आवश्यक आहे. रक्कमही घेताना ती कमीतकमी असावी, याचे भानही राखणे आवश्यक आहे. ही रक्कम कर्जाऊ असल्याने निर्धारित मुदतीत ती परतफेडही करणे आवश्यक आहे. ही…