करदात्यांना दिलासा; रिटर्न फायलिंगला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

वर्षभरातील सर्व आर्थिक कामे पूर्ण करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२० होती. मात्र दोन आठवड्यात सध्या देशभर 'करोना'चा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाउनची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्लीत केली. पॅन क्रमांक आधार क्रमांका जोडण्यासाठी आता ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. आता नागरिकांना ३० जूनपर्यंत अतिरिक्त मुदत मिळाली आहे. सरकारने व्यावसायिकांना देखील दिलासा दिला आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे जीएसटी रिटर्न आता ३० जूनपर्यंत सादर करता येणार आहेत. ५ कोटींहून कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना विलंब आकार आणि दंड माफ करण्यात आला आहे.…

तिमाही निकाल जाहीर करण्याचा नियम शिथिल

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा मोठा फटका कंपन्यांच्या कामगिरीवर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यासंदर्भात सेबीने आपला नियम शिथिल केला आहे. आता कंपन्यांना चौथ्या तिमाहीचे निकाल 30 जूनपर्यत जाहीर करता येणार आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगावे लागत आहे किंवा काही कामकाज तहकूब करावे लागत आहे. यासर्वांचा विपरित परिणाम कंपन्यांच्या कामकाजावर झाला आहे.    सेबीच्या नियमानुसार शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांना तिमाही संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत त्या तिमाहीचे निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सेबीने चौथ्या तिमाही निकालांसंदर्भात कंपन्यांना वाढीत मुदत दिली…

“पॉवर ऑफ कम्पाउंडिंग’

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे त्यावर मिळणारे "व्याज'. यावर तुमच्या संपत्तीत होणारी वाढ अवलंबून असते. हे परताव्याचे गणित सर्रास सरळ व्याज पद्धतीने मोजण्याचा सर्वांत सोपा मार्ग अवलंबिला जातो. समजा, वार्षिक 10 टक्के व्याजदराने 100 रुपये ठेव योजनेत गुंतविले, तर सरळ व्याज पद्धतीने लाभाचे सोपे गणित मांडताना एक वर्षानंतर तुमच्या मुद्दलावर परतावा म्हणून 10 रुपये मिळतील. पुढील वर्षीदेखील तुम्हाला 10 रुपये मिळतील. या पद्धतीने तुम्ही जितक्‍या कालावधीसाठी मुदतठेव केली असेल, तितक्‍या कालावधीसाठी तुम्हाला हे व्याज मिळेल. मात्र, त्यात वार्षिक 10 रुपयांचीच भर पडेल, म्हणजेच येथे ज्या रकमेवर व्याज मोजले आहे ती रक्कम, अर्थात मुद्दल तिन्ही वर्षांत एकसारखीच धरली आहे.    बहुतांश वित्तीय…

महिला दिन — धनलाभ तर्फे शुभेच्छा !!

कालच महिला दिन साजरा झाला !  सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत असे दिसत असूनही अनेक महिलांमध्ये अर्थसाक्षरता आहे हे जाणवत नाही ! महिलांनी  अर्थसाक्षर व्हावे यासाठी या काही प्राथमिक सूचना धनलाभतर्फे करण्यात येत आहेत !! बहुतांश महिला त्यांचे आर्थिक व्यवहार पाहत नाहीत, ही समस्या आहे. याच वेळी दीर्घकालीन निर्णय आणि आर्थिक नियोजन यापासून महिला दूर राहतात. महिलांना दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा आत्मविश्‍वास आणि अनुभव नसणे अथवा पतीकडून स्वातंत्र्य न मिळणे अथवा पालकांकडून त्यांच्यातील या नैसर्गिक क्षमतेला डावलले जाणे, ही यामागील कारणे असतात. खूप आधीपासून भारतीय महिला या बचत करणाऱ्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करणाऱ्या आहेत, हे माहिती असूनही हे याकडे दुर्लक्ष झाले…

करोना हे संकट की संधी ?

आपल्या देशामध्ये आपण आधीच मंदीसदृश वातावरणाचा अनुभव घेत आहोत. अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा प्रत्येक तिमाहीत खाली येताना दिसत आहे, त्यात आता हे करोना संकट. जर हे संकट वेळीच आटोक्यात नाही आले तर आपण मंदीच्या विळख्यात लवकरच सापडू असे वाटणे चुकीचे नाही. आज आपल्या शेअर बाजाराने  आठवडय़ाभरात जरी दहा ते बारा टक्के नुकसान करून घेतले आहे आणि त्यात अजूनही वाढ होऊ शकेल अशी दाट शक्यता आहे. बऱ्याच भारतीय कंपन्या फारशी चांगली कामगिरी दाखवत नव्हत्या, परंतु सरकारने कराचे दर कमी केल्यामुळे त्यांना थोडा फायदा झाला. पण आपल्या देशातील ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्या ज्या प्रमाणात चीनवर विसंबून आहेत, त्या…

महिला दिन आणि NPS व समृद्धी —

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. हा आपल्या आयुष्याचा असा काळ असतो जेव्हा आपल्याला स्वतंत्र आणि चिंतामुक्त आयुष्य जगण्याची इच्छा असते. यासाठी सेवानिवृत्ती निधी तयार करणे हे गरजेचे असते, जेणेकरून उतारवयात आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. छोट्या कुटुंबांच्या वाढत्या ट्रेंडमुळे सेवानिवृत्तीचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. काम करत असताना आणि धडधाकट आयुष्य जगतानाच निधी उभारायला सुरवात केली तर आपल्याला नियमित आवक सुरू राहते. या निधीतून निवृत्ती योजना खरेदी केल्या जाऊ शकतात. यातून मिळणारे उत्पन्न आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरू राहते. गृहिणीसाठी पती या योजना खरेदी करू शकतात आणि संयुक्त परतावा पर्याय निवडू शकतात. यामुळे, काही अघटीत घडले तरीही त्यांना…

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील व्याज घटले

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गुरुवारी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे (ईपीएफ) व्याजदर ०.१५ टक्क्यांनी घटवले. यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफवर ८.६५ टक्क्यांऐवजी ८.५० टक्के व्याज मिळणार आहे. ईपीएफवरील घटवलेला हा व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे.

‘हे’ नियम बदलले

'हे' नियम बदलले १) एसबीआय ग्राहकांसाठी केवायसी : स्टेट बँकेच्या ज्या खातेधारकांनी अद्याप 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना एक मार्चपासून खात्यातील रक्कम काढता येणार नाही. स्टेट बँकेने ग्राहकांना २८ फेब्रुवारीपर्यंत 'केवायसी' पूर्ण करण्याविषयी बजावले होते. 'केवायसी' पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांचे खातेही ब्लॉक करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. २) मोफत 'फास्टॅग' बंद : मोफत 'फास्टॅग'ची सुविधा २९ फेब्रुवारीला बंद करण्यात आली असून, १ मार्चनंतर संबंधितांना ते खरेदी करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने महसुलात वाढ करण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून २९ फेब्रुवारीपर्यंत 'फास्टॅग' मोफत देण्याची घोषणा केली होती. १ मार्चनंतर १०० रुपये दिल्यानंतरच 'फास्टॅग' उपलब्ध होणार आहे.…

या फंडाचा परतावा पहा —

यु टी आय चा या फंडाचा परतावा पहा आणि यामध्ये एक तरी SIP सुरु करा अशी सर्वाना आग्रहची विनंती आहे !! कमी होत जाणारे बँक्सचे दर पाहता आपली सुद्धा एखादी चांगल्या फंडात SIP असावी अशी " धनलाभ " ची इच्छा आहे !! On 24/2/2020, UTI Equity Fund has corrected by -1.53% v/s Benchmark Nifty 500 TRI which corrected by -2% and Nifty 50 which corrected by -2.08%. As of 24/2/2020 ... Last 1 year return is 19.51%, 2 years 11.24%, 3 years 12.89%, 5 years 9.01% and 10 years 13.22%. Annual portfolio turnover is just 14% and is a reflection…

तत्काळ पॅनकार्ड हवंय? या गोष्टी करा–

www.incometaxindiaefiling.gov.in. या वेबसाइटवर लॉग इन केल्यावर ग्राहक त्याचा आधार क्रमांक सादर करून तात्काळ ई पॅनकार्ड काढू शकतो. ही सुविधा मोफत आहे. त्याशिवाय यात तुम्हाला कोणतेही कागदपत्रे अपलोड करावी लागत नाहीत. केवळ ज्यांनी पॅनकार्ड काढली नाहीत अशा नागरिकांना यात तात्काळ पॅनकार्ड उपलब्ध केले जाईल. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर त्या नागरिकाने आधार कार्ड काढताना जो मोबाइल क्रमांक नोंदवला असेल, त्या क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी टाइप केल्यानंतर त्याच्या साह्याने आधारचा तपशाली तपासला जाईल. हा तपशील बरोबर असल्यास तत्काळ त्या नागरिकाला पॅन क्रमाक दिला जाईल. यामुळे पॅन कार्डासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतून करदात्याची सुटका होईल.

End of content

No more pages to load