अपघात व सुरक्षा
दोन वर्षांपूर्वी आमच्या शेजारच्या एका कुटुंबामध्ये दोन कर्तीसवर्ती मुले कामाच्या ठिकाणी जात असताना मोटर अपघाताने निधन पावली. या कुटुंबात नव्यानेच नोकरीला लागलेले हे दोन सख्खे भाऊ नोकरीच्या ठिकाणी दररोज जात असत. म्हणजेच जाण्यायेण्याचा रस्ता त्यांच्या कायमचा परिचयाचा होता. पण अपघात कधी सांगून होत नाही.कामाच्या जागेवर पोहोचण्यापुर्वी मोटरसायकला ट्रकचा धक्का बसला व काही कळायच्या आत होत्याचे नव्हते झाले. यांच्या घरात निव्वृत्तीला आलेले आईवडील व यापैकी एका भावाचे लग्न झाल्यामुळे त्याची लहान मुलगी व पत्नी पूर्णपणे अवलंबून असलेली माणसे आहेत. या अपघातामुळे या कुटुंबावर खूपच वाईट प्रसंग ओढवला गेला. असा प्रसंग कोणत्याही कुटुंबावर येऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. पण अपघात हा…