SIP मधून पैसे कसे काढायचे?

एसआयपीमधून पैसे काढताना कोणते घटक लक्षात घेतले पाहिजेत? पैसे कधी काढले जावे आणि कोणत्या प्रकारचे कर आकारले जाऊ शकतात? हे आज थोडक्यात पाहूया !! रिडेम्पशनपूर्वी लॉक इन पीरियड तपासायला हवा. ELSS मध्ये 3 वर्षांचा लॉक-इन आहे. जर गुंतवणूक एसआयपीद्वारे केली गेली असेल, तर फक्त पहिली एसआयपी ३ वर्षांनी आणि दुसरी तीन वर्ष १ महिन्यानंतर काढता येऊ शकते. जर फंडचा परतावा चांगला सुरू असेल तर आणि पैशाची तत्काळ गरज नसेल, तर पहिल्या एसआयपीपासून ४ वर्षांनी एकरकमी पैसे काढले जावेत. काही फंडांना ठराविक वेळेपूर्वी रिडीम केल्यास १% किंवा त्याहून अधिक एक्झिट लोड शुल्क भरावे लागते. इक्विटी फंडांच्या बाबतीत, वेळ फ्रेम सहसा एक…

NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना

NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना गेल्या दोन वर्षातील कोरोना कालावधीतील “वर्क फ्रॉम होम” या परिस्तिथीमुळे *आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक नियोजन * यांमध्ये लोकांच्या विचारसरणीमध्ये बराच फरक पडलेला जाणऊन येत आहे. “वर्क फॉर्म होममुळे” मेट्रो सिटीमध्ये अनेकजण आपल्या क वर्ग किवा ब वर्ग शहरातील घरातून काम करत आहे. मुलांची शाळा, कॉलेज हे सुद्धा घरातून चालू होते . आणि दुर्दैवाने कुटुंबातील एखादा सदस्य विलगीकरणात राहावयाचा झाल्यास या सर्वांना आपल्या घरातील स्पेसचे नियोजन करणे थोडेफार कठिण झाले होते . या नियोजनाबरोबर आरोग्य विम्याचे महत्त्व अधोरेखित झालेले जाणवत आहे. आणि नव्याने नोकरीतील तरुण असो किंवा आयुष्याच्या पन्नाशीला झुकलेली मंडळी असो या सर्वांनाच आपल्या निवृत्ती नंतरच्या…

शिक्षणाचे महत्व

शिक्षणाचे महत्व मुलांचे शिक्षण ही आपल्या आयुष्यतील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आपल्या मुलांना जगातील उत्तम शिक्षण संस्थामध्ये शिकवायचे असेल तर आजपासून बचत आणि गुंतवणूक करा आणि किमान आपल्या लहान लेकरासाठी तरी अर्थसाक्षर व्हा ! यापूर्वी या गोष्टी डेडीकेटेड शिक्षकांच्या भरवशावर होत असत. पण सध्या अशी शक्यता कमी होत चाललेली आहे. आणखी काही वर्षांनी केवळ पदवीसाठी आपली मुले परदेशी जाणे अपरिहार्य होईल आणि त्यासाठी किमान २५ ते ५० लक्ष खर्च येणार आहे. दर्जेदार शिक्षणाची सोय होण्याच्या दृष्टीने वर नमूद केलेली रक्कम जमा करण्यासाठी सर्व सामान्य नोकरदार किंवा व्यावसायिक १५ वर्षे SIP करून आपल्या मुलाला उच्चशिक्षित करू शकतो. मात्र त्यासाठी खालील आर्थिक…

फक्त १०००० दरमहा – बना कोट्याधीश —

शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असतानाही गुंतवणुकदारांमध्ये म्युच्युअल फंडची मोठी क्रेझ आहे. SIP द्वारे रिटेल गुंतवणुकदार म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक करतान दिसत आहेत. मागील महिन्यात एसआयपीद्वारे १३,८५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एसआयपीद्वारे लहान गुंतवणूक करुन मोठे रिटर्न्स मिळवता येतात. दीर्घकाळ गुंतवणूक करुन कोट्यवधींचा फंड जमा करू शकता. म्युच्युअल फंड्सच्या अशा अनेक स्कीम आहेत, ज्यात दीर्घकाळासाठी सरासरी वार्षिक १२ टक्के रिटर्न्स मिळतात. SIP दीर्घकाळासाठी ठेवल्यास कम्पाउंडिंगचा मोठा फायदा होता. जर तुमचं वय २५ वर्ष असेल आणि तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी २० वर्ष इतका ठेवला असेल, तर याचा मोठा फायदा होईल. SIP Calculator नुसार, तुम्ही वयाच्या २५व्या वर्षी दर महिन्याला १० हजार रुपयांची…

निवृत्तजीवनाचे नियोजन–

सेवानिवृत्त जीवनांत १५ वर्षे लोटलेले श्री देशपांडे  यांना सतावणारा मुद्दा काय? तर निवृत्तीपश्चात मिळालेला पैसा त्यांनी एका खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतविला होता. त्यामधून मिळणारी रक्कम स्थिर असली तरी १५ वर्षांपूर्वी पुरेशी वाटणारी रक्कम आता अपुरी पडायला लागली होती. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना खात्री होती की त्यांच्या निवृत्तीपश्चात मिळालेल्या पैशातून ते समाधानाने आयुष्य जगू शकतील. परंतु व्याजदर इतक्या झपाटय़ाने कमी होतील अशी कल्पना नसल्याने त्यांना आता खर्चाचा मेळ घालणे अशक्य झाले होते. देशपांडेयांचे नेमके काय चुकले आणि त्यांच्यासारख्या चुका न व्हाव्यात यासाठी काय करता येईल? निवृत्तीपश्चात नियोजन वाटते तितके सोपे मुळीच नाही. कमावत्या दिवसांतच आपण आपले आर्थिक नियोजन कसे…

आर्थिक स्वातंत्र्य

आर्थिक स्वातंत्र्य ही अशी मानसिक स्थिती आहे जी आपण आपल्या आर्थिक स्थितीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झालो आहोत असे वाटू लागल्यावर तसेच आपण आपल्या मनात वारंवार पैशांच्या बाबतीत विचार करणे थांबवून जीवनाचा मनमुराद आनंद उपभोगू याचा आत्मविश्वास वाटू लागल्यावर अनुभवू शकतो. आर्थिक स्वातंत्र्य फक्त नोकरी, व्यवसाय, स्वरोजगारामुळे येणाऱ्या उत्पन्नामुळे मिळत नाही. असे उत्पन्न तुमचे दैनंदिन जीवन जगण्याचे साधन असते परंतु बराचवेळ आपण ही मिळकत सुरु झाल्यावर  आर्थिक स्वतंत्र झालो अशी समज करून घेतो . ही समजूतच मुळी चुकीची आहे. जो पर्यंत आपण अशा मिळकतीवर आपले दैनंदिन जीवन जगणे अवलूंबून ठेवतो तो पर्यंत आपण आर्थिक स्वातंत्र्य पासून दूर असतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैशाचे…

वॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-

जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस आहे. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय प्रभावी ठरते. बफे यांनी वेळोवेळी सार्वजनिक मंचांवर गुंतवणुकीबाबतचे त्यांचे अनुभवही सांगितले आहेत. जाणून घ्या गुंतवणूक गुरू बफेंचे 5 गुंतवणूक मंत्र.. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते. परंतू त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका…

आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —

आज १५ ऑगस्ट रोजी आपण ७६ वा स्वातंत्र दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य या शब्दात एक जादू आहे, हा शब्द शुद्ध हेवेत घेतलेल्या मोकळ्या श्वासासारखा अनुभव देऊन जातो. भारतीय राज्य घटनेने आपल्याला बरेच मूलभूत हक्क दिले आहेत. ते सगळे एक प्रकारचे स्वातंत्र्यच आहे. माणसाला जगण्याची मोकळीक मिळाली म्हणजे त्याच्यातील प्रतिभेला उभारी मिळते आणि तो उतुंग शिखरे पदांकृत करण्याचे ध्येय स्वतः समोर ठेवतो. मनातील ऊर्जेचा स्रोततच मुळी आपल्याला कडे असणारे स्वातंत्र्य असते . पारतंत्र्य या शब्दाची वेदना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जाणली आणि त्यातून आपल्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त केले. आत्ताच्या स्वतंत्र भारतात इंग्रज सरकारच्या पारतंत्र्याची बोचरी जाणीव आपण अनुभवत नसलो…

ब्लू चीप शब्द कसा आला?

ब्लू चीप शब्द कसा आला? ब्लू चीप हा शब्द कोठून आला याची माहिती आपण अगोदर करून घेऊया. १९ व्या शतकात अमेरिकेत पोकर हा खेळ प्रतिष्ठेचा होता. या खेळात पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगाच्या चीप्स म्हणजे चकत्या वापरल्या जायच्या. या चीप्सचे मूल्य अनुक्रमे १ डाॅलर, ५ डाॅलर आणि २५ डाॅलर असे. म्हणजे यामध्ये निळ्या रंगाच्या चीप्सचे मूल्य सर्वाधिक होते. त्यानंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात उच्च मूल्यासाठी ब्लू चीप शब्द वापरण्याची परंपराच झाली. त्यानंतर याची व्याप्ती वाढत जाऊन उच्च मूल्यांकन असलेल्या मालमत्तेसाठीसुद्धा ब्लू चीप हा शब्द वापरला जाऊ लागला. अमेरिकन शेअर बाजारात १९२० च्या सुमारास उच्च भावातील शेअर्स किंवा उत्तम प्रतीचे शेअर्स…

टर्म इन्शुरन्स

पन्नास लाखांचा मुदत विमा काढल्यास (टर्म इन्शुरन्स) मृत्यू झाल्यानंतर खरंच पन्नास लाख रुपये मिळतात का? टर्म इन्सुरन्सचा अर्थ प्रथम समजून घेऊया! टर्म इन्शुरन्स म्हणजे तुमच्या आयुष्याचा विमा. जितक्या वर्षांचा विमा उतरविला गेला असेल, तितक्या वर्षांच्या आत जर विमाधारकाच्या बाबतीत काही बरीवाईट घटना घडली, तर त्याच्या कुटुंबाला विम्याची पूर्ण रक्कम मिळते. उदा: जर 'अ' ने, वयाच्या पंचविसाव्या वर्षी आपला पन्नास लाखांचा जीवन विमा उतरवला, तर त्याला पुढील पन्नास वर्षे, म्हणजे त्याच्या वयाच्या पंचाहत्तर वर्षांपर्यंत (टर्म इन्सुरन्सची जास्तीत जास्त मर्यादा), दरवर्षी ₹.4,400 (अंदाजे) इतका हप्ता भरावा लागेल. त्याचवेळी, त्याचा मित्र 'ब' ने तितकेच ₹.4,400 बँकेत आरडी मध्ये गुंतविण्यास सुरवात केली असे मानुया.…

End of content

No more pages to load