देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’च्या प्राथमिक समभाग विक्रीद्वारे र्निगुतवणूक करण्यासाठी विक्रीपूर्व सल्लागार म्हणून एसबीआय कॅप्स आणि डेलॉइट यांच्या नेमणुकीस सरकारने हिरवा कंदील दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीत मांडलेल्या अर्थसंकल्पात प्राथमिक भागविक्रीद्वारे एलआयसीमधील सरकारी भागभांडवलाची अंशत: विक्री करण्याची घोषणा केली होती. देशाच्या आयुर्विमा व्यवसायात ७५ टक्क्यांदरम्यान हिस्सा असलेल्या एलआयसीची मालमत्ता ३१ लाख कोटी रुपयांच्या घरात असून, ती सध्या १०० टक्के सरकारी मालकीची कंपनी आहे.
- Post published:August 25, 2020
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments