विमा पॉलिसीवर घेता येते वैयक्तिक कर्ज

करोनाच्या काळात अनेकांना नाजूक आर्थिक परिस्थितीतून जावे लागले. काहीजणांच्या व्यवसायावरही परिणाम झाला, तर काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज भासली. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील loanघेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला  विमा पॉलिसी घ्यायची असेल किंवा आधीच विमा काढला असेल, तर तुम्ही त्यावर सहजपणे कर्ज घेऊ शकता. आरोग्य विमा पॉलिसीवर कर्ज घेणे, हा एक चांगला पर्याय आहे, कारण विमा पॉलिसीवरील कर्ज मिळणे खूप सोपे आहे आणि त्यावर व्याज देखील कमी आहे. विमा पॉलिसीवरील व्याजाचा दर प्रीमियमची रक्कम आणि भरलेल्या प्रीमियमच्या संख्येवर अवलंबून असतो. जीवन विम्यावरील कर्जावरील व्याज १०-१२ टक्के दरम्यान असते. या आधारे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कर्जाची…

नवीन वर्षासाठी चांगले आर्थिक संकल्प

 नवीन वर्षासाठी चांगले आर्थिक संकल्प करतांना मूलभूत आर्थिक बाबी समजणे हिताचे आहेत. याच बाबी पुढे तुमचे आर्थिक संकल्प बनतात !! आपल्या पहिल्या पगारापासून गुंतवणूक सुरू करा. आपल्या जीवनाची आर्थिक उद्दीष्टे ओळखा. त्यांना अल्प मुदतीच्या, मध्यम-मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या श्रेणीमध्ये विभाजित करा. ध्येय-आधारित गुंतवणूक सिद्धांतानुसार(Goal Based Investment Theory) गुंतवणूक करा. ध्येयाविरहित गुंतवणूक करू नका. केलेली प्रत्येक गुंतवणूक आपल्या आर्थिक ध्येयाशी संबंधित करा. मूलभूत गरजा आणि इच्छिक गरजा (needs and wants) या खर्चाच्या पॅटर्न नुसार आपल्या खर्चाचे विश्लेषण करण्यास प्रारंभ करा. आपण WANTS वर जास्त खर्च करीत आहात की नाही ते तपासा. मासिक जमाखर्च आणि ताळेबंद मांडा तसेच मासिक बचत दर निश्चित…

गणतंत्र दिन

गणतंत्र दिन आमचे सर्व ग्राहक हितचिंतक आणि वाचक बंधू भगिनींना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा ! या वर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत आणि त्या अनुषंगाने अनेक विचार मनात येत आहेत. गेल्याच आठवड्यात भारतीय गुतंवणूकदारांच्या बचतीसंबंधीचा एक अहवाल वाचनात आला.  त्यातील आकडेवारी अत्यंत सोप्या शब्दात मी आज आपल्यासमोर मांडू इच्छीतो. सर्वसामान्यत: एकूण गुंतवणुकीपैकी भारतातील प्रत्येकजण १८% रक्कम बँकेत गुंतवतो.१६% पेक्षा जास्त रक्कम विमा योजना अर्थात Endowment Plan संबधी योजनेत असते आणि २५% गुंतवणूक ही दागिन्यांच्या रुपात असते आणि उर्वरित सर्व गुंतवणूक ही घर किंवा तत्ससंबधी गोष्टीमध्ये अडकलेली असते . अपवादात्मक स्थितीत काहीजण Equity मध्ये पैसे गुंतविताना दिसतात.…

नेट वर्थ स्टेटमेंट म्हणजे काय ?

आपण एखाद्या आर्थिक संस्थेशी व्यवहार करताना कधी कधी आपले नेट वर्थ स्टेटमेंट मागवले जाते. अशा वेळी नेट वर्थ स्टेटमेंट म्हणजे काय आणि ते कसे मिळवावे असे प्रश्न निर्माण होतात. नेट वर्थ म्हणजे काय ते समजून घेऊया? सोप्या भाषेत सांगायचे तर नेट वर्थ तुमची आर्थिक पत. नेट वर्थ कसे काढावे ? नेट वर्थ = आपल्या मालकीच्या मालमत्ता (Assets)- आपल्याकडे असलेली उत्तरदायित्व (loans) नेट वर्थ स्टेटमेंट म्हणजे आपल्या आर्थिक आरोग्याचा अहवाल. जसे ब्लड टेस्ट आपल्याला आपल्या आरोग्यबद्धल माहिती देते, सध्या आपले आरोग्य कसे आहे ते दर्शवितो अगदी तसेच नेट वर्थ स्टेटमेंट आपल्याला आपल्या आर्थिक स्थिती बाबत आपली सद्य परिस्थिती दर्शवितो. जर नेट…

अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळवू शकतो. खाते उघडण्यासाठी किंवा या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेशी संपर्क साधावा लागेल. या योजनेचा लाभ वयाच्या ६० व्या वर्षी दिला जातो. या अंतर्गत पती-पत्नी दोघेही स्वतंत्र खाते उघडून लाभ मिळवू शकतात. अटल पेन्शन योजना  ही सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्याचा लाभ भारतातील सर्व नागरिकांना वयाच्या ६० वर्षांनंतर दिला जातो. ही नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) च्या फ्रेमवर्कवर आधारित आहे. एपीवाय अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक महिन्याला एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि पाच हजार…

गृह कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी—

गृह कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी खाली काही उपाय लिहित आहे, जमतील तेवढे करा व बघा लवकरच कर्जमुक्त व्हाल : गृहकर्ज रक्कम एवढे तुमचे जीवन बीमाकृत नसल्यास सर्वप्रथम ते करून घ्या. तुमच्या पश्चात घरच्यांच्या डोक्यावर छप्पर तसेच राहील. दर महिन्याचा हप्ता कधीच बुडवू नका. चेक/ इसीएस बाऊंस झाला तर क्रेडिट स्कोअर खराब होतो. दर वर्षी पगारवाढ झाली की त्या अनुषंगाने तुमचा मासिक हप्ता ही वाढवून घ्या. अशी सोय असते. अगदी ५००-१००० रुपये ही वाढवतां आले तरी चांगले कारण वाढवलेली रक्कम मूळ मुद्दल मधून वजा होते. दर वर्षी पगाराव्यतिरिक्त बोनस/ एक्स ग्रेशिया/ इंसेंटिव्ह मिळाला की ती “प्रीपेमेंट” म्हणून मुद्दल खाती जमा करा.…

सामान्य गुंतवणूकदार काय करतात?

जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असते तेव्हा बहुतेक वेळा सामान्य गुंतवणूकदार काय करतात? आपल्यापैकी बरेचजण प्रसिद्ध वेबसाइटवर जातात आणि म्युच्युअल फंडाची स्टार रेटिंग पाहतात. आपल्याला एकाच वेबसाइटवर अवलंबून राहणे धोक्याचे वाटत असल्याने आपण अशा २/३ वेबसाइट्सवर जाऊन स्टार रेटिंग तपासतो आणि या सगळ्या वेबसाइटवर ज्या म्युच्युअल फंडाचे नाव असेल अशा फंडाला पसंती दर्शवतो. आपली मासिक गुंतवणूक ५/१० हजार जरी असेल तरीही आपण ४/५ स्टार फंडांची निवड करतो. १/२ हजाराची गुंतवणूक करताना ५ फंडांची निवड केल्यास आपल्याला वाटते कि आपण आपल्या जोखमीला कमी केले . परंतु असे करून आपण खरोखरच गुंतवणुकीत वैविध्य आणले की त्याच त्याच प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून…

पोर्टफोलिओ मॅनेजमेंट

पोर्टफोलिओ मॅनेज करून देण्याविषयी ज्या जाहिराती किंवा मार्केटिंग केले जाते, त्यामुळे बऱ्याच वेळा गुंतवणूकदारांना वाटते की, त्यांनी investment केल्यानंतर लगेचच १६ ते २० टक्के किंवा उच्चतम परतावा यायला सुरवात होईल. हीच खरी गोंधळाची सुरुवात आहे. मुळात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काय आहे हे समजून घ्या. सेबीच्या मार्गदर्शक त्तत्वांनुसार गेल्या वर्षीपर्यंत पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये २५ लाख रुपये किमान गुंतवणूक ही मर्यादा होती आणि त्याकरिता त्यावर फी सुद्धा आकारली जायची. याचा अर्थ तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ एकाच पीएमएस संस्थेकडून तयार करायचा असेल व त्याच संस्थेने तुमच्या वतीने गुंतवणुकीचे निर्णय घेऊन तो पोर्टफोलिओ राखायचा असेल तर त्यासाठी त्या पीएमएसकडे तुम्हाला किमान २५ लाख रुपये जमा करावे लागतील.…

आयुर्विमा घेताना लक्षात ठेवायच्या बाबी

जीवनांत आयुर्विम्याची साथ असायलाच हवी आणि आयुर्विमा घेण्याचा निर्णय शक्य तितक्या लवकर घेतला जायला हवा. तथापि तुमचा निर्णय चुकीचा ठरून पश्चातापाची वेळ येऊ नये या साठी लक्षात ठेवायच्या बाबी--- १. योग्य रकमेचा विमा घ्या. मासिक उत्पन्नाच्या किमान १०० पट विमा असायला हवा. विमा प्रकारातील ‘टर्म इन्शुरन्स’ (मुदत विमा) सर्वाकडेच असायला हवा. या विमा प्रकारात कमी विमा हप्त्यात अधिक रकमेचे विमा संरक्षण मिळते. २. विमा घेण्याचा आपला उद्देश काय आहे हे लक्षात घ्या. केवळ विमा प्रतिनिधी सांगतो म्हणून तो विमा प्रकार घेऊ नका. ३. जर बचत आणि गुंतवणुकीसाठी लागणारी शिस्त आपल्याजवळ नसेल तर विम्याकडे बचतीचा अनिवार्य मार्ग म्हणून बघा. कारण असे…

आपली गुंतवणूक

काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची गोष्ट बाजारात घडली ज्याचे निरीक्षण साधारण कोणी केलं नसेल आणि ती म्हणजे आतापर्यंतची सर्वाधिक उलाढाल राष्ट्रीय शेअर बाजारात झाली. ती तारीख होती ८ नोव्हेंबर २०२१. साधारण ३६९ कोटी रुपयांचे व्यवहार या दिवशी बाजारात केले गेले. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे, मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवल या बाजारात येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,००,००० होईल आणि निफ्टी २५,००० ते २८,००० असेल हे उगाचच सांगितलं जात नाहीये. त्याहीमागे एक सांख्यिकी डेटा आहे. याचा अभ्यास किंवा निरीक्षण आपण मराठीजन करत नाही. हे मुद्दाम लिहितो आहे, कारण अशी माहिती कोणीही ब्रोकर किंवा सल्लागार सहसा आपल्याला…

End of content

No more pages to load