गरज अर्थसाक्षरतेची
सन १९९० मध्ये मी चिपळूणला असताना आमच्या शेजारी पोस्ट ऑफिस होते व तेथील पोस्टमास्तर माझ्याकडे बचतीचा मंत्र सांगण्यासाठी आले . त्यांनी दरमहा रू. ५०० / - ची NSC तुम्ही सुरु करावी असे सांगून ६ वर्षात ही रक्कम दुप्पट होईल त्याची पुनर्गुंतवणूक ४ वेळा त्याच योजनेत करावी आणि निवृत्तीच्या वेळी या परताव्याची रक्कम अतिरिक्त निवृत्तीवेतन म्हणून आपणास मिळू शकेल असे सांगितले . त्यांची योजना स्वीकारून मी सहा वर्षे दरमहा रू. ५०० /- ची NSC घेऊ लागलो . पण नंतर व्याजदर कमी कमी होत गेले , माझी चिपळूण येथून बदलीही झाली , व सर्वात महत्वाचे म्हणजे पोस्टल सेवेतील दिरंगाईमुळे ही मूळ…