गृहविमा
आपल्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी आपण अविरत कष्ट करतो. ते सुरक्षित राखण्यासाठी संरक्षक दरवाजा, कॅमेरे व उत्तम दर्जाचे कुलूप अशी सुरक्षा साधने वापरतो. सर्वसाधारणपणे आपल्या आयुष्यातला प्रदीर्घ काळ घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच घालवतो. मात्र, गृहविम्यासारखे अतिशय महत्त्वाचे सुरक्षा साधन आपण विसरतो. भारतात एकूणच विमा उतरवण्याचे प्रमाण अतिशय अत्यल्प म्हणजेच एक टक्क्याहूनही कमी आहे. त्यामुळे गृहविमा उतरवण्याचे प्रमाण त्याहूनही कमी आहे. घराचा मालक अथवा त्याचा वापर करत असणारी कोणतीही व्यक्ती गृहविमा उतरवू शकते. भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीदेखील गृहविमा घेऊ शकतात. घराची मालकी एखाद्या संस्थेकडे असल्यास अशी संस्थादेखील विमा उतरवू शकते. गृहविम्यामध्ये आग व त्या संबंधित घटना, दरोडा, चोरी, दहशतवादी हल्ला आदी…